विवाहित असूनही हिंदू नाव वापरून जाळे फेकायचा त्यानंतर लग्न झाले की ?

शेअर करा

समाजामध्ये चांगल्या वृत्तीच्या लोकांबरोबरच वाईट प्रवृत्ती ठेवून काम करणारे अनेक लोक आहेत. एकीकडे लग्नासाठी मुलीचे प्रमाण मुळातच कमी असताना एक भामटा मुलींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्याशी लग्न करायचा आणि महत्त्वाचे म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलींना धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले जायचे. अबिद असे या भामट्याने नाव असून तो उत्तर प्रदेशातील आहे.

अबिद नावाचा हा व्यक्ती अगोदरच पाच मुलांचा बाप आहे. मात्र तरीही तो तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचा आणि त्यांच्याशी लग्न करायचा. आबिद हा स्वतःला गुन्हे शाखेचा इन्स्पेक्टर आदित्य सिंग असल्याचे सांगायचा जेणेकरून हिंदू मुलींना जाळ्यात ओढता यावे. एकदा मुली जाळ्यात आल्या की लग्नाचा घाट घालायचा आणि दबाव टाकून धर्म परिवर्तन घडवून आणायचा. उत्तर प्रदेशमधील आजमगड येथील हा प्रकार असून पोलिसांनी इंदिरानगर सेक्टर 9 भागामध्ये त्याला पकडले आणि अटक केली.

दोन लग्न केल्यानंतर त्यानं तिसरं लग्न दुसऱ्या धर्मातील एका मुलीबरोबर फेब्रुवारी महिन्यात केलं. तो तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवत असल्याने तरुणीनं त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला होता. लग्न झाल्यावर मात्र त्यानं आपलं खरं रूप सांगत आपला अगोदर देखील विवाह झाला असल्याचे तिला सांगून तिच्याशी लग्न केलं. निकाह झाल्यानंतर धर्म परिवर्तन करून या तरुणीचं नाव त्यानं आयशा असं ठेवलं होतं. दुसरं लग्न झाल्यानंतरही सर्व काही ठीक सुरू होतं. मात्र त्यांच्या अंगातली मस्ती काही जात नव्हती.

फेब्रुवारी महिन्यात त्यानं मध्यप्रदेशमधील आणखी एका मुलीसोबत आपण हिंदू असल्याचे सांगून लग्न केले. त्यावेळी मात्र दुसऱ्या पत्नीनं त्याच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक, लव्ह जिहाद इत्यादी कारणांवरून तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी आबिदला अटक केली असून त्याची तपासणी सुरू आहे. त्याच्याकडं आदित्य सिंह नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची आयडेंटिटी कार्ड सापडले आहे. संपूर्ण आयुष्यभराचा प्रश्न असल्यानं तरुणींनी अशा एखाद्याच्या तावडीत सापडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.


शेअर करा