प्रेमी युगुलांच्या आत्महत्येनंतर घरच्यांनी घेतला ‘ असा ‘ निर्णय की..

शेअर करा

प्रेमी युगुलाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्हातील भडगाव इथे उघडकीस आली होती. भडगाव तालुक्यातील वाडे याठिकाणी एका प्रेमीयुगुलाने शाळेतच्या परिसरातच गळफास लावून आत्महत्या केली होती. कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिल्यानं संबंधित प्रेमीयुगुलांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली असून आधी दोन्ही कुटुंबानी यांच्या प्रेमप्रकरणाची आपल्याला माहितीच नव्हती असे म्हटले होते.

जिवंतपणी मुलांचं प्रेम न कळालेल्या पालकांनी मात्र मृत्यूनंतर स्मशानभूमीत त्याचं लग्न लावून दिलं आहे. अग्निडाग देण्यापूर्वी दोघांच्या कुटुंबीयांनी संबंधित जोडप्याचं स्मशानभूमीत विधीवत लग्न लावून देत त्यांची लग्नाची इच्छा पूर्ण केली आहे. मुकेश कैलास सोनवणे (वय 22) आणि नेहा बापू ठाकरे (वय 19) असं आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावं आहेत. एकाच समाजातील असूनही नाते योग्य नसल्याने त्यांच्या लग्नाला घरातून विरोध होता.

मृत नेहा आणि तिचे कुटुंबीय मागील काही महिन्यांपूर्वी आपल्या मामाच्या गावाला भडगाव तालुक्यातील वाडे याठिकाणी वास्तव्याला आले होते. नेहाची ओळख वाडे येथील रहिवासी असलेल्या मुकेशशी झाली. काही दिवसांनी त्यांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि नंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या चोरून भेटीगाठी सुरु झाल्या .

दोघांत प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती दोघांच्या कुटुंबीयांना मिळाली. दोघंही एकाच समाजाचे होते. त्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांकडून मुलीच्या घरच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण मुकेश हा नेहाचा नात्यानं चुलत मामा लागत असल्यानं मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. यानंतर नेहाच्या कुटुंबीयांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. मुकेश आणि नेहाच्या प्रेमविवाहाचा आशा अशा रीतीने धूसर होत गेल्यानंतर यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

1 ऑगस्ट रोजी पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान वाडे येथे नव्यानं उभारण्यात येत असलेल्या शाळेच्या इमारतीतील एका लोखंडी सळईला गळफास लावून आत्महत्या केली आहे. मुकेशनं आत्महत्या करण्यापूर्वी स्टेटसला ‘बाय’ असं लिहिलं होतं. यानंतर 1 ऑगस्ट रोजी सकाळी दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत. यावेळी घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडली नाही.

शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांची एकाच वेळी पण वेगवेगळी अंत्ययात्रा काढण्यात आली. यानंतर कुटुंबीयांनी स्मशानभूमीतच दोघांचं विधीवत लग्न लावून दिलं आहे. यावेळी गावातील अनेक नागरिक याठिकाणी उपस्थित होते. पोलिसांनी दोघांबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करून घेतली आहे. पोलीस या घटनेचा चहुबाजूंनी तपास करत असून जर घरच्यांनी वेळीच ऐकले असते तर ही वेळ आली नसती. परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .


शेअर करा