बच्चू कडू यांची प्रकृती खालावली , आता पुढचा अर्धा तास कुणालाही.. 

शेअर करा

गेल्या काही दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रकृती खालावली असून ते सध्या आंदोलनस्थळीच असून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढच्या अर्धा तास कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे.

दुसरीकडे बच्चू कडू यांनी काहीही झालं तरी मी अन्नाचा एकही कण खाणार नाही. जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मी माघार घेणार नाही. काहीही झालं तरी मी अन्नाचा कण खाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केल आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टर कार्यरत असून त्यांनीच पुढचा अर्धा तास बच्चू यांची कोणालाही भेट घेता येणार नाही, असे सांगितले आहे.

दुसरीकडे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रहार संघटनेचे महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते अमरावती शहरात दाखल होत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरीदेखील बच्चू कडू यांच्या गुरुकुंज मोझरी येथील उपोषणस्थळी जमा होत आहेत.

बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला असून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आज बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. या भेटीत जरांगे यांनी कडू यांना आपला पाठिंबा दर्शवत त्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात, असे मत व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कष्टकरी, कामगार, महिला यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन ते आंदोलनाला बसले असून आज बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस आहे. 


शेअर करा