अहिल्यानगर शहरात बोटावर मोजता येईल इतक्याच चौकात सध्या सिग्नल कार्यरत आहेत. एकीकडे खराब रस्त्यांमुळे नगरकरांची धांदल उडालेली असताना दुसरीकडे बंद पडलेले सिग्नल्स यामुळे अपघात होण्याचे देखील प्रकार वाढलेले आहेत अर्थातच प्रत्येक प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचत नसल्याने पोलिसांना देखील सिग्नल सुरू व्हावेत अशी इच्छा मनातून दिसून येत नाही.
शहरातील प्रेमदान चौकातील सिग्नल गेल्या अनेक महिन्यांपासून अखेरच्या घटका मोजत आहे. मनमाड रोडवरील या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते मात्र तरीही नादुरुस्त सिग्नलमुळे अनेकदा किरकोळ अपघात देखील होत असतात असाच अपघात काल प्रेमदान चौकात झालेला असून अज्ञात वाहनाने तळीराम बांधवांना ज्ञान पाजणाऱ्या त्या सिग्नललाच धडक देऊन सिग्नलचाच बळी घेतला आहे . केवळ प्रेमदान चौकच नव्हे तर शहरातील एकविरा चौक भिस्तबाग चौक या ठिकाणी देखील सिग्नल बंद असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत.
दुसरीकडे जुना पिंपळगाव माळवी रोड इथे रस्त्याचे काम सुरू असल्याने भाजी मार्केटसाठी जागा राहिली नाही त्यामुळे पाईपलाईन रोडवरच सध्या भाजी बाजार थाटला जात आहे त्यामुळे अपघाताची शक्यता आणखीन मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. वाहतूक पोलिसांनी तात्काळ वाहतुकीच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.