बेलवंडी पोलीस ठाण्यात खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी , फिर्यादींची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव

शेअर करा

श्रीगोंदा तालुक्यात बेलवंडी पोलीस ठाणे इथे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी गुन्ह्यातील कलमे वाढवण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली सोबतच पैसे दिले नाहीत तर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली अशी तक्रार फिर्यादी संजय दिवटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली आहे. 

पोलीस अधीक्षकांना याविषयी निवेदन देण्यात आलेले असून त्यात ,’ फिर्यादी व्यक्ती आणि त्यांच्या मामांमध्ये जमिनीच्या कारणातून वाद होते त्याचे पर्यावरण हाणामारीत झाले. गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी व्यक्ती पोलीस ठाण्यात गेले त्यावेळी संतोष भंडारे यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आणि त्यानंतर किरकोळ गुन्हा दाखल करून घेतला . 

गुन्ह्यात कठोर कलमे लावावी अशी फिर्यादी यांची मागणी होती त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी अडीच लाख रुपयांची मागणी केली असे फिर्यादीचे म्हणणे आहे. समोरच्या व्यक्तींनी तीन लाख रुपये दिले आहेत तू पैसे दिले नाहीत तर तुझ्याच भावावर खोटा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकेल अशी देखील धमकी भंडारे यांनी दिल्याचे त्यांनी निवेदनात म्हटलेले आहे. 

संतोष भंडारे यांनी याविषयी माध्यमांना अधिक माहिती देताना ,’ परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामुळे संबंधित यांचे जबाब आणि सरकारी वकिलांच्या सल्ल्यानेच कलमे वाढवण्यात आलेले आहेत. पैसे मागण्याचा प्रश्न यामध्ये उद्भवत नाही ,’ असे त्यांनी म्हटलेले आहे. 


शेअर करा