‘ हिंदू धर्मियांनी कधीच कुणाचे बळजबरीने धर्मांतर केलेले नाही मात्र इतर देशात हिंदू धर्मांतरामुळे असुरक्षित आहेत त्यामुळे धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात केवळ मोर्चे काढून उपयोग नाही तर प्रत्येकाने धर्मांतर रोखण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकारने धर्मांतर तसेच लव्ह जिहादच्या विरोधात कडक कायदा आणावा ,’ अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केलेली आहे.
बावीस तारखेला सकाळी अहिल्यानगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यावेळी संग्राम जगताप बोलत होते. गोपीचंद पडळकर देखील यावेळी उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की ,’ सांगली जिल्ह्यातील ऋतुजा राजगे या उच्चशिक्षित भगिनीचा धर्मांतरामुळे बळी गेलेला आहे त्यामुळे हिंदूंनी जागृत राहायला हवे.’
गोपीचंद पडळकर म्हणाले की ,’ सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर अहिल्यानगर जिल्ह्यात होते त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील बेकायदेशीरपणे उभे राहिलेल्या धार्मिक स्थळांची शहानिशा करून त्यावर तात्काळ बुलडोजर फिरवावा. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनेक जण खोटे दाखले देतात त्यांना देखील तातडीने बडतर्फ करावे .’