भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका भाषणादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सरकार आणि स्वतःच्या विरोधात टीका करणाऱ्या तरुणांविषयीच आक्रमक शब्दांत संताप व्यक्त केला आहे . “कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधभक्त म्हणतात,” असे म्हटले आहे .
एका भाषणादरम्यान बबनराव लोणीकर यांनी ,’ “हीच कार्टी कूचवट्यावर बसून चर्चा करत असते, आणि त्यांच्यापैकी काहींच्या आईचा पगार व बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच दिलं आहे . नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले ” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते .
बबनराव लोणीकर यांच्या या विधानाचा बच्चू कडू यांनी समाचार घेत ,’ आमच्या घामाच्या पैशावर देश चालतो,अन्नधान्य आम्ही पिकवतो, आमच्या मतावर तु व तुझा बाप पण निवडुन येतो. अन आमचा बाप काढतो. तुझा बाप असेल मोदी जगाचा बाप शेतकरी आहे. ‘ असे म्हटले आहे .
सगळीकडून चौफेर टीका झाल्यावर बबनराव लोणीकर यांनी ,’ राजकीय लोकांना माझ्या वक्तव्याच्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. माझ्या विरोधात पळता भुई करू, असे विरोधक बोलत आहेत. मी शेतकऱ्यांच्या विरोधात गेल्या 40 वर्षात कधीही बोललो नाही. जनता जनार्दन माझी मायबाप आहे. शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने मी 25 वर्ष निवडून येत आहे. त्याच्यामुळे मी जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात बोललो नाही. माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गरीब माणूस किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणार नाही. मला शेतकऱ्यांची माफी मागायला काय, मी हजार वेळा शेतकऱ्यांची माफी मागील ,’ असे म्हटले आहे.