अहिल्यानगर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून चक्क एका शालेय विद्यार्थ्याकडून दुसऱ्या एका विद्यार्थ्याचा खून झाल्याचा प्रकार शहरात घडलेला आहे. आठवीतील विद्यार्थ्याकडून दहावीतील विद्यार्थ्याचा खून झाला असून त्यानंतर अहिल्यानगर शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या एका विद्यालयातील ही घटना आहे.
आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून केला आहे. दोन्ही विद्यार्थी एकाच भागात राहणारे आहेत. क्रिकेट खेळाच्या करणावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं. शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झालं. यात आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला आणि या हल्ल्यात दहावीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला.
तोफखाना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आठवीतील विद्यार्थ्याला ताब्यात घेतलेले आहे. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्याचे प्रकार शहरात सातत्याने समोर येत असून रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे याची जामीनावर सुटका होतात चक्क शहरातून मिरवणूक काढण्यात आलेली होती 80 जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून शाळेत खुनाचा प्रकार घडल्यानंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.