महाराष्ट्र हादरला..लग्न जुळेनाच म्हणून शेतकरी तरुणाने तुराट्यांची गंजी पेटवली अन ?

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली असून लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून एका वैफल्यग्रस्त तरुणाने चक्क स्वतःचे सरण रचून अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या केली आहे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ही घटना असून पळशी खुर्द येथे हा प्रकार घडलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शेतकरी कुटुंबातील असलेला महेंद्र नामदेव बेलसरे (वय २७ ) गेल्या काही दिवसांपासून लग्न जुळत नसल्याने नैराश्यात गेलेला होता. बुधवारी तो घराबाहेर पडला आणि आणि संध्याकाळी त्याने शेतात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले आणि त्यानंतर जवळच असलेल्या तुरीच्या गंजीत स्वतःला पेटवून दिले. आगीमुळे होरपळल्यानंतर आरडाओरडा करत त्याने जवळ असलेल्या पाण्याच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र त्यापूर्वीच तो शेणखताच्या ढिगाऱ्यावर कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.

शेगाव येथे बहिणीकडे गेला असताना त्याने आपले लग्न जुळत नसल्याची खंत बहिण आणि जावई धनंजय शेडे यांच्याकडे व्यक्त केली होती. शेगाव येथून पुन्हा येताच त्याने हा प्रकार केल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे शेतकरी मुलगा असेल तर अनेक पालक शेतकऱ्याच्या घरात मुली देण्यासाठी इच्छुक दिसत नाहीत त्यामुळे शेतकरी तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे प्रचंड अडचणीचे झालेले पहायला मिळत आहे.


शेअर करा