चार जूननंतर मोदी पंतप्रधान नसतील अन शिंदे यांच्यासोबत गेलेल्यांचं तर ..

शेअर करा

‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही . त्यांच्या सभांना गर्दी होत नाही. महाराष्ट्रात ते केव्हा येतात सभा केव्हा होतात आणि केव्हा निघून जातात हे जनतेलाही समजत नाही. चार जूननंतर मोदी पंतप्रधान नसतील ‘ असे भाकीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेले आहे. 

संजय राऊत हे जळगाव जिल्ह्यात पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी ते म्हणाले की, ‘ देशभरात सध्या इंडिया आघाडीच्या बाजूला वातावरण आहे. मोदी आणि भाजपच्या पायाखालील वाळू सरकलेली आहे. मोदींच्या भाषणावर लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही. प्रत्येक सभेत ते धादांत खोटे बोलत आहेत. त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद शून्य असून चार जूननंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की , ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात त्यांच्याशी मला काही घेणेदेणे नाही. या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गद्दारांचे राजकीय अस्तित्व संपलेले असेल .’ 


शेअर करा