भाडेकरू म्हणून आली अन मालकीण बनली पण तरीदेखील होता पैशांचा हव्यास : उचलले धक्कादायक पाऊल

शेअर करा

प्रेमात पडून लग्न तर केले मात्र पुढे पत्नीची नियत फिरली आणि पत्नी लाखोंच्या किंमतीचे दागिने व रोकड घेऊन वधू पतीच्या घरातून पळून गेली. मात्र प्रकरण इतक्यावर न थांबता तिने पतीला जिवे मारण्याची धमकी देखील देण्यास सुरुवात केली . शेवटी पीडित पतीने पत्नीविरूद्ध पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देखील दाखल केली . अनुराग कुमार असे पीडित पतीचे नाव असून मौसम कुमारी असे युवतीचे नाव आहे .

बिहारच्या बेगूसरायमध्ये मौसम कुमारी भाडेकरू म्हणून अनुराग यांच्या घरी आली होती मात्र त्यानंतर ती त्यांच्या प्रेमात पडली . भाडेकरू म्हणून राहत असताना पीडित पती मौसम कुमारीच्या अभ्यासाखेरीज इतर सर्व खर्च पाहत होता. पुढे जाऊन युवतीला अकाऊंटंट म्हणून नोकरी मिळाली तेव्हा अनुराग यांच्याशी तिने लग्नही केले . लग्नानंतरही काही दिवस मौसम कुमारी अनुरागबरोबर तिच्या घरी राहिली आणि लाखो रुपयांचे दागिने आणि इतर सामानाची खरेदी केली.

जानेवारी २०२० मध्ये मौसम कुमारी आपल्या आईची तब्येत ठीक नसल्याचे सांगत ती माहेरी निघून गेली, त्यावेळेची मौसमने पतीच्या घरातून 60 ग्रामचे दागिनेही सोबत घेतले. माहेरी गेल्यानंतरही तिने तिच्या पतीकडून सुमारे एक लाख रुपये दोन वेळा खात्यात मागवून घेतले. नवरा वारंवार तिला घरी नेण्यात सांगूनही ती वेगवेगळे कारणे देऊन टाळत राहिली मात्र अखेर तिने अनुरागला फोनवर परत कधीही येणार नाही असे सांगितले तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

या धमकीनंतर अनुराग कुमार यांना प्रचंड धक्का बसला आणि त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. मुख्यालयाचे डीएसपी कुंदनकुमार सिंह म्हणाले की, अनुराग कुमार यांनी लग्नाच्या पुराव्यासह अर्ज दाखल केला असून त्याचा तपास सुरू आहे. अर्जामध्ये अनुराग कुमार यांनी पंचायती राज विभागातील लेखापाल मौसम कुमारी यांनी प्रेम प्रकरणात लग्न केल्याबद्दल आणि लग्नानंतर दागिने व पैशाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. पोलिस सर्व गोष्टींचा शोध घेत आहेत, त्यानंतरच संपूर्ण प्रकरण उघडकीस येईल.


शेअर करा