लग्नाच्या मेकअपसाठी ‘ ती ‘ ब्युटीपार्लरला कधी येते यावर होती त्याची नजर मात्र पुढे जे घडले ?

शेअर करा

आज तिचे लग्न होते त्यामुळे मेकअपच्या तयारीसाठी ती ब्युटी पार्लरमध्ये गेली. मात्र त्याचवेळी एक तरुण तिथे आला आणि त्याने चाकूने वार करत तिची हत्या केली. लग्नाच्या दिवशीच नवरीची हत्या करण्याची ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात घडली असून मध्य प्रदेशात कायद्याचे राज्य आहे का ? हा प्रश्न आता प्रत्येकजण विचारू लागला आहे .भाजप शासित उत्तर प्रदेशात आठ पोलिसांचे हत्याकांड ताजे असतानाच भाजपशासित राज्यातच ही दुसरी धक्कादायक घटना घडली आहे .

मयत तरुणी ही शाजापूर जिल्ह्यातील नाग-नागिण रोड येथे राहणारी होती. लग्नासाठी तरुणी रतलाम जिल्ह्यात आली होती. सकाळी नऊ वाजता ब्युटीपार्लरमध्ये मेकअप करण्यासाठी गेली होती त्यावेळी तिची अमानुष हत्या करण्यात आली. हल्लेखोर हा सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला असून तो नक्की कोण होता याचा अद्याप खुलासा झालेला नाही.

ज्यावेळी तो पार्लरमध्ये घुसला त्यावेळी त्याच्या हातात चाकू होता.तरुणीचा मेकअप सुरु असताना त्याने अचानक तिचा गळा चिरला आणि तो तेथून पसार झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसाढवळ्या तरुणानं ब्युटी पार्लरमध्ये घुसून तरुणीची हत्या कशी केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची वार्ता तरुणीच्या गावी पसरल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, तरुणीचं हे दुसरं लग्न होतं, मात्र तिने तिच्या पहिल्या नवऱ्याला रीतसर घटस्फोट दिलेला होता. मृत तरुणीच्या नातेवाइकांकडे पोलीस चौकशी करत आहेत. नवरी मुलगी सोनू ही बहिणीसोबत ब्युटी पार्लरमध्ये आली होती. तेव्हा एक तरूण चाकू घेऊन पार्लरमध्ये घुसला. त्यानं चाकूनं गळा कापला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जावरा पोलीस अधिकारी सी. एस. पी. राणावत हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.


शेअर करा