बंडा तात्या कराडकर यांची जीभ घसरली , महात्मा गांधींचा ‘आक्षेपार्ह ‘ उल्लेख

शेअर करा

वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींचा आक्षेपार्ह उल्लेख केलेला असून त्याच्या या वक्तव्याबद्दल सोशल मीडियासह नागरिकांमध्ये देखील संताप व्यक्त केला जात आहे. स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनी ते पुण्यातील खेड राजगुरूनगर येथे बोलत असताना त्यांची जीभ घसरली असल्याचे पहायला मिळाले.वारकरी संप्रदायातून आलेल्या व्यक्तीकडून असली भाषा वापरली गेल्याने त्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे . बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींचा उल्लेख म्हातारा असा केला असल्याने नागरिकांचाही त्याविषयी संताप पहायला मिळत आहे.

बंडा तात्या कराडकर काय म्हणाले ?

दहा वर्षाच्या काळात भगतसिंहानी केलेली क्रांती ही अभूतपूर्व होती. त्या काळात सुरुवातीला भगतसिंहांवर महात्मा गांधींची छाप होती. महात्मा गांधींचा अहिंसावाद भगतसिंहांच्या मनामध्ये ठासवला होता. आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायचं आहे, पण भगतसिंहांचा हा भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. 1922ला एक हत्याकांड झालं, त्या हत्याकांडात त्याला समर्थन देण्यात महात्मा गांधींनी नकार दिला. तेव्हा भगतसिंह महात्मा गांधींवर नाराज झाले.

भगतसिंहांच्या मनावर हा परिणाम झाला, की आता या म्हाताऱ्याच्या ‘या’ मार्गाने जायचं काही कारण नाही. त्यानंतर ते क्रांतिकारक बनले.लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आहे. या म्हाताऱ्याच्या पद्धतीनं जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर एक हजार वर्षे लागतील. शेवटी आपल्याला हे माहीत आहेच 1947 साली आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे अहिंसेच्या मार्गाने मिळालेलं नाही.

1942ला जी क्रांतिकारक चळवळ उभी राहिली, चले जाओ क्विट इंडिया. त्यामध्ये पोलिसांची कार्यालये, सरकारी कार्यालय पेटवणं, रेल्वे रूळ उखडणे या ज्या घटना घडत गेल्या. यातून इंग्रजांनी बोध घेतला, की आता भारत देश सोडल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कुठंतरी असं सांगितलं जातं की ‘साबरमती के संत तुने कर किया कमाल, दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल.’ असं म्हणणं म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये आपल्या प्राण्यांच्या आहुत्या दिल्यात, अशा साडे तीनशे लोकांचे फोटो इथे मागे आहेत. त्या साडे तीनशे लोकांच्या संपूर्ण क्रांतीचा अपमान केल्यासारखं आहे.


शेअर करा