‘ आता तू चांगली दिसत नाहीस ‘, लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..

शेअर करा

महाराष्ट्रात लग्न जमण्यापूर्वी मुलाला मुलगी दाखविण्याची प्रथा काही शतकांपासून सुरू आहे हे मात्र अनेकदा लग्न झाल्यावर देखील ‘ अवघ्या काही मिनिटात तुला पाहून निर्णय घेतला होता मात्र आता माझा निर्णय बदलला आहे ‘ असेदेखील म्हणणारे अनेक महाभाग समाजात आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथे समोर आलेला असून तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झाले मात्र त्यानंतर आता तू चांगली दिसत नाहीस असे म्हणत एका विवाहितेस नांदण्यास नकार देण्यात आलेला आहे.

पीडित महिलेने सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून लग्न करून थाटामाटात लग्न झाल्यावर अवघ्या तीन वर्षात आता तू चांगली दिसत नाही असे म्हणून विवाहितेस नोंदवण्यास नकार दिल्याप्रकरणी सुधीर रघुनाथ रवळे या महिलेच्या पतीवर तर पारूबाई रवळे, गोरखनाथ रवळ या सासू-सासर्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पीडितेने म्हटले आहे की लग्नानंतर काही महिन्यांनी सासू-सासर्‍यांनी आणि नवऱ्याने तुझ्या आई-वडिलांनी लग्नात हुंडा आणि दागिने दिले नाहीत असे सांगत आपल्याला त्रास दिला. मजुराप्रमाणे आपल्याला शेतात काम करण्यास पाठवले आणि घरी देखील आल्यानंतर समाधान लाभू दिले नाही. वेळोवेळी आपण त्यांना मला सुखाने नांदू द्या अशी विनंती करत होते मात्र त्यांनी आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तसेच पती यांनी देखील आईवडिलांच्याच बाजूने भूमिका मांडत आपली बाजू ऐकून घेतली नाही असे पीडितेचे म्हणणे आहे .


शेअर करा