रात्री बिछान्यावरून तीन सख्ख्या बहिणी गायब , आई बाहेर आली तेव्हा..

शेअर करा

देशात एक खळबळजनक घटना नुकतीच समोर आली असून मध्य प्रदेशातील खंडवा येथे तीन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतर्गत कोटाघाट या गावात ही घटना घडली असून सोनू, सावित्री आणि ललिता अशी मयत बहिणींची नावे आहेत. तीनही बहिणींनी कोटाघाट या गावात झाडाला गळफास लावून आपले आयुष्य संपवले.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह झाडावरून काढले होते. तीनही बहिणींनी अचानकपणे असे टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप पर्यंत समोर आलेले नाही. कुटुंब हे सुखवस्तू असून कुटुंबावर कुठल्याही स्वरूपाचे कर्ज नव्हते. आत्महत्येपर्यंत जावे इतके मोठे कुठलेही कारण नव्हते यामुळे या प्रकारानंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी रात्री जेवण करून सर्व बहिणी झोपायला गेल्या होत्या मात्र रात्रीच्या वेळी त्या बिछान्यात आढळून आल्या नाही म्हणून आईने शोध घेतला त्या वेळी घराच्या पाठीमागे असलेल्या कडूलिंबाच्या झाडाला तिघीनींही गळफास घेतलेला होता. सदर दृश्य दिसताच आईने हंबरडा फोडला आणि या प्रकाराची पोलिसांना माहिती देण्यात आली.

आठ भावंडांचे हे संपूर्ण कुटुंब असून त्यातील दोन बहिणीचे लग्न झाले होते तर सोनू ही मयत बहिणींमध्ये मोठी होती. मंगळवारी दुपारी तीन बहिणी बाजारात गेल्या होत्या आणि त्यांनी बाजारातून दोरी देखील आणली होती मात्र दोरी आणली हे लक्षात आल्यावर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी काहीतरी कारण वेळ मारून नेली होती आणि अचानकपणे त्यांनी हा धक्कादायक प्रकार केलेला आहे.


शेअर करा