‘ पुन्हा एक दुजे के लिए ‘ , समाज स्वीकारणार नाही ना आपले रिलेशन म्हणून ..

शेअर करा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक दुजे के लिए प्रकरण समोर आले असून एक तरुण आणि तरुणीने नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे एक तारखेला रेल्वे महामार्गावर आत्महत्या केलेली आहे. संदेश सिटी येथे हा प्रकार उघडकीला आलेला असून प्राथमिक माहितीनुसार हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक होते. त्यांच्यात प्रेमसंबंध देखील होते मात्र नाते आडवे येत असल्याने समाज आपल्याला स्वीकारणार नाही या भीतीतून त्यांनी हा प्रकार केला.

उपलब्ध माहितीनुसार, जितेंद्र काशीराम नेवारे ( वय 35 राहणार बाबा फरिद नगर मानकापूर नागपुर ) व स्वाती पप्पू बोपचे ( वय 19 राहणार तुम खेडा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया ) अशी मयत जोडप्याची नावे आहेत. स्वाती ही जितेंद्र यांच्या मावसभावाची मुलगी असून जितेंद्र याची पत्नी वर्षभरापूर्वी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. पाण्याच्या गाडीवर जितेंद्र ड्रायव्हर म्हणून काम करायचा याच वेळी त्याचे आणि स्वातीचे प्रेमसंबंध निर्माण झाले. तिला भेटण्यासाठी तो गोंदिया येथे देखील जायचा मात्र त्यांचे नाते आडवे येत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

स्वातीला भेटून जितेंद्र 30 तारखेला नागपूरला आलेला होता त्यानंतर बुधवारी तीदेखील नागपूरला आली. दोघेही दिवसभर सोबत राहिले आणि गुरुवारी एक तारखेला सकाळी आठच्या सुमारास त्यांचे मृतदेह रेल्वे लाईनवर आढळून आले. त्यांच्यातील संबंधाची माहिती ही जितेंद्रची आई लक्ष्मी यांना देखील नव्हती त्यामुळे त्यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदवली नव्हती.

सदर प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी त्यांच्याकडील इतर साहित्य यासोबतच तुटलेला मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. सायबर सेलच्या मदतीने फोनच्या मदरबोर्डमध्ये वापरला गेलेला मोबाईल क्रमांक मिळाला त्यावेळी तो जितेंद्र नेवारे यांच्या नावावर असल्याचे समोर आले त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र याच्या घरी पोहोचून आईला हे साहित्य दाखवले त्यावेळी आईने जागीच टाहो फोडला.


शेअर करा