‘ भारत जोडो ‘ मध्ये भाजप गुरफटली , मीडिया मॅनेज केला लोकांचे काय ?

शेअर करा

काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केल्यापासून भाजपच्या गोटामध्ये एकच खळबळ उडाली असून भारत जोडो यात्रेला नागरिकांचा मिळत असलेला मोठा प्रतिसाद पाहून भाजप हादरून गेलेली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया अन प्रेस मीडिया यामध्ये विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसलाच आरोपीच्या पिंजर्‍यात भाजप सत्तेत आल्यापासून केले जात होते आणि स्वतःवर प्रश्न येऊ नयेत याची काळजी घेतली जात होती मात्र आता काँग्रेस रस्त्यावर आल्यानंतर याचा मुकाबला करायचा कसा ? यातच भाजप गुरफटलेली पाहायला मिळत आहे. स्मृती इराणीपासून तर भाजप प्रवक्त्यांचे सगळेच दावे खोटे आढळून येत आहेत.

काँग्रेसची सोशल मीडिया सेल देखील मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत असून काँग्रेसने सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या युनिफॉर्मचा भाग असलेली खाकी हाफ पॅन्ट आणि बेल्ट याला जळत असल्याचे चित्र पोस्ट केले होते. हे चित्र पोस्ट केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. कॉंग्रेस हिंसक कृत्यासाठी चिथावणी देत आहे असेही त्यांचे म्हणणे होते.

सदर छायाचित्र पोस्ट करताना काँग्रेसने ‘ विद्वेषाच्या बेड्यापासून देशाला मुक्त करायचे आहे. भाजप आणि आरएसएसने केलेले देशाचे नुकसान आता भरून काढायचे आहे त्यासाठी एक पाऊल पुढे जाऊन आपण उद्दिष्टपूर्ती करू आणि १४५ दिवस बाकी ‘ असे म्हटले होते. भाजपने नेहमीप्रमाणे या मुद्द्याला हिंदुत्वाशी जोडत काँग्रेसवर टीका केलेली असून काँग्रेसने एक प्रकारे केरळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना लक्ष करा अशी चिथावणी दिली आहे असे म्हटले आहे तसेच काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट केलेले हे छायाचित्र तात्काळ काढून टाकावे असे देखील म्हटले आहे.

काँग्रेसच्या ह्या ‘ भारत जोडो ‘ चा मुकाबला करण्यासाठी बहुतांश मीडियाला भाजपचे मुख्य हत्यार असलेल्या ‘ धार्मिक तेढ ‘ विषयावर जास्त प्रमाणात कार्यक्रम करण्याचे आदेश देण्यात आल्याची देखील सूत्रांची माहिती आहे त्यामुळे गोदी मीडियात आता धार्मिक मुद्द्यावरून वातावरण तापवण्यात येण्याची शक्यता आहे.


शेअर करा