लग्नासाठी म्हणून आलेला जावई सासऱ्यासोबत गेला अन .. , बीडची घटना

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना बीड जिल्ह्यात समोर आलेली असून धारूर परिसरात तीन दिवसांवर मेव्हण्याचे लग्न आलेले असताना लग्नासाठी सासरी आलेल्या जावयाने सासऱ्याचा अमानुषपणे खून केलेला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील ही घटना असून धारूर पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दत्तात्रय रामभाऊ गायके ( वय 58 ) असे मयत सासऱ्याचे नाव असून त्यांचा जावई असलेला रामेश्वर गोरे ( राहणार हिंगणगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव ) असे आरोपी जावयाचे नाव असल्याचे समजते . दत्तात्रय यांच्या मुलाचा विवाह ११ जून रोजी ठरलेला होता आणि त्या निमित्ताने त्यांचे अनेक नातेवाईक केंद्रेवाडी येथे मुलाच्या घरी आलेले होते.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास सर्वांनी सोबत जेवण केले आणि अचानकपणे सासरा आणि जावई दोघेही गायब झालेले होते. सकाळपर्यंत दोघेही घरी आले नाहीत म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला त्यावेळी दत्तात्रय गायके यांचा मृतदेह एका ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला सोबतच आरोपी रामेश्वर याची दुचाकी देखील तिथे पडलेली आढळून आली. रामेश्वर हा दत्तात्रय यांना सातत्याने पैशासाठी त्रास देत होता. ती मागणी पूर्ण केली नाही म्हणून त्याने खून केल्याचे तक्रारीत म्हटलेले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.


शेअर करा