अबकी बार 400 पार होणार आहे म्हणून.., काय म्हणाले राधाकृष्ण विखे ? 

शेअर करा

लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असून महायुती आणि महाविकास आघाडी प्रचंड ताकतीनिशी संघर्षात उतरलेली आहे.  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हार इथे बोलताना लोकसभा निवडणुकीत ‘ अबकी बार 400 पार होणार आहे ‘ असा दावा केलेला आहे. शिर्डीच्या महायुतीच्या खासदारांचा सहभाग त्यामध्ये असलाच पाहिजे असे देखील आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले आहे . 

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की , ‘ विरोधी महाविकास आघाडी नसून महाभकास आघाडी आहे ’. महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी राधाकृष्ण विखे पाटील आलेले होते. 

राधाकृष्ण विखे पाटील पुढे बोलताना म्हणाले की ,’ उमेदवारीसाठी त्यांच्यात मारामाऱ्या सुरू आहेत. एकीकडे सामर्थ्यवान महायुती तर दुसरीकडे भ्रष्टाचार झाकण्यासाठी सत्तावीस पक्षांची महाविकास आघाडी तयार झालेली आहे. भारत महासत्ता ही पंतप्रधान मोदी यांची सर्वात मोठी उपलब्ध आहे ‘, असेही ते यावेळी म्हणाले . 


शेअर करा