नवनीत राणा यांना हिंदू मुस्लिम सोडून मुद्दाच सुचेना की , म्हणाल्या की… 

शेअर करा

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पुन्हा हिंदू मुस्लिम सोडून दुसरा विषय सुचत नसल्याचे दिसून येत आहे. . त्यांच्या टीकेला अर्थातच ओवेसी बंधू यांच्याकडून प्रतिउत्तर देण्यास सुरुवात झालेली असून नेहमीप्रमाणे प्रत्येक मुद्दा हिंदू मुस्लिमवर घेऊन जाण्याचा भाजपचा अजेंडाच नवनीत राणा राबवत असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या प्रत्येक नेत्यांची वक्तव्य सातत्याने हिंदू मुस्लिम चीन पाकिस्तान काश्मीर ट्रिपल तलाक गाय गोबर याच्यातच अडकलेली असून दुसरीकडे भाजपची  बी टीम म्हणून आरोप होत असलेल्या एमआयएमकडून देखील नवनीत राणा यांना उत्तर देण्यास सुरुवात झालेली आहे. 

काय म्हणाल्या नवनीत राणा ? 

महाविकास आघाडीच्या उमेदवाराला केलेलं मत हे पाकिस्तानला जाणार आहे. त्यामुळे आपलं मत वाया घालवू नका. जो राम को लाये है हम उनको लायेंगे. काँग्रेसला राम मंदिर नाही तर बाबरीशी प्रेम आहे आमच्या मोदीजींना रामाशी प्रेम आहे.

महिलांवर बोलण्याऱ्यांसाठी गदा काफी आहे असं म्हणत नवनीत राणा यांनी गदा दाखवून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. नवनीत राणा यांनी म्हटलं की, या गदेची ताकद उद्धव ठाकरेंना जास्त माहित आहे. एका महिलेला 14 दिवस जेलमध्ये टाकलं त्यामुळे स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही सर्व सोडून चालले गेले ही आमच्या रामाची ताकद आहे. 

हैदराबादमध्ये भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी गेलेल्या नवनीत राणा यांचं वक्तव्य चर्चेत आलं होतं. यात त्यांनी ओवेसी बंधूंना खुलं आव्हान दिलं आहे. ‘15 सेकंदांसाठी पोलीस हटवा. मग मोठ्या आणि धाकट्याला कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गायब झाले’, असं म्हणत नवनीत राणांनी ओवेसींना आव्हान दिलं. त्यानंतर असदुद्दीन ओवैसींनी प्रत्युत्तर देताना 15 सेकंद काय, एक तास घ्या, कुठे यायचं सांगा अशा शब्दात आव्हान दिलं होतं. महागाई बेरोजगारी या विषयांवर भाजपकडे सध्या बोलण्यासारखे काहीच राहिलेले नाही त्यामुळे पुन्हा 2014 च्या धर्तीवर धार्मिक आधारावरच मते मागण्यास मते मागण्यास सुरुवात झालेली आहे. 


शेअर करा