अटलबिहारींच्या काळातील ‘ ह्या ‘ केंद्रीय मंत्र्याचा भाजपाला रामराम, तृणमूलमध्ये प्रवेश

शेअर करा

अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परदेश मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी भाजपला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसची वाट धरली आहे.. शनिवारी दुपारी यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर यशवंत सिन्हा दीर्घकाळापासून सक्रीय राजकारणातून दूर होते. वेळोवेळी त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीकाही केली मात्र अखेर त्यांनी आज भाजप सोडून दिली आहे .

शनिवारी सकाळी यशवंत सिन्हा कोलकाताला दाखल झाले. इथे त्यांनी तृणमूल काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांच्याकडून दिनेश त्रिवेदी यांच्या जागेवर यशवंत सिन्हा यांना राज्यसभेत धाडले जाऊ शकते. ‘ ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये जो हल्ला झाला. तो टिपिंग पॉईंट होता. तेव्हाच मी तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा आणि ममतांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला’, असं स्पष्टीकरण यशवंत सिन्हा यांनी दिलं.

यशवंत सिन्हा पुढे म्हणाले, ‘अटल बिहारी वाजपेयींच्या काळात भाजपचा सर्वसाधारण सहमतीवर विश्वास होता परंतु, आजच्या सरकारचा केवळ दडपशाही आणि जिंकण्यावर विश्वास आहे. अकाली दल, बीजेडी देखील भाजपमधून वेगळे झाले आहेत. आज भाजपसोबत कोण उभं आहे ? ‘ अशी टीका यावेळी यशवंत सिन्हा यांनी भाजपवर केली.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या पार्श्वभूमीवर अनेक नेते तृणमूल काँग्रेसचा हात सोडत भाजपच्या गोटात दाखल होत आहेत. महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुकांआधी असेच झाले होते मात्र अखेर काय झाले आहे चित्र महाराष्ट्रासमोर आहे . शिवसेना, काँग्रेस & राष्ट्रवादी निवडणुकीनंतर एकत्र आले आणि भाजपच्या १०५ आमदारांवर घरी बसण्याची वेळ आली. अशाच स्वरूपाचे चित्र पश्चिम बंगालमध्ये देखील कदाचित होण्याची शक्यता आहे .

कोण आहेत यशवंत सिन्हा ?

आयएएसची नोकरी सोडून यशवंत सिन्हा राजकारणात दाखल झाले होते. चंद्रशेखर सरकारमध्येही ते मंत्री होते. अटल बिहारी वाजपेयींच्या ते अगदी जवळचे नेते होते. परंतु, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप मात्र पूर्णपणे वेगळी असल्याचं मत त्यांनी अनेकदा व्यक्त केलं होत. यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारचा अनेकदा विरोध केला होता. मोदींच्या आर्थिक धोरणांसहीत परराष्ट्र धोरणांवरही त्यांनी अनेकदा उघडपणे टीका केली होती.

भाजपचा राजीनामा दिल्यानंतर यशवंत सिन्हा यांची नाराजी उघड झाली होती. मात्र यशवंत सिन्हा यांचा मुलगा जयंत सिन्हा हे मात्र अजूनही भाजपचे खासदार आहेत. यशवंत सिन्हा हे मूळचे बिहारचे असून बिहारचेच दुसरे नेते शत्रून्घ सिन्हा यांनी देखील आधी कित्येकदा भाजपच्या नेतृत्वाच्या कार्यशैलीवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे . शत्रून्घ सिन्हा यांनी देखील २०१९ साली भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.


शेअर करा