पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू , ‘ ह्या ‘ व्यक्तीला बळीचा बकरा ठरवणार ?

शेअर करा

भारतीय किसान यूनियनचे नेते गुरनाम सिंह चड़ूनी यांनी करनाल पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये जखमी झालेल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.चड़ूनी यांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये सुशील काजल नावाच्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी या ट्वीटमध्ये दिली आहे. ते गेल्या 9 महिन्यांपासून शेतकरी आंदोलनात सक्रीय होते. चड़ूनी ट्विटमध्ये म्हणतात की , “देश का कनून कहता है लाठीचार्ज पैरों में किया जाए, लेकिन किसानों के सिर में लाठियां मारने के ऑर्डर दिए गए”

भाजपशासित राज्यात शेतकरी आणि गोरगरिबांवर होणारे अत्याचार लपून राहिलेले नाहीत. शनिवारी हरियाणा राज्यात पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या लाठीचार्ज मध्ये जवळपास दहा लोक जखमी झाले. होते. त्या दरम्यान शेतकऱ्यांनी हरियानातील कर्नालकडे जाणारा महामार्ग रोखला होता. शेतकरी भाजपच्या सभेला विरोध करत होते. ज्यात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, प्रदेश भाजपा प्रमुख ओम प्रकाश धनखड़ आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते त्यामुळे भाजप नेत्यांचा अहंकार दुखावला गेला आणि त्यातून जनरल डायरच्या पद्धतीने शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचे आदेश दिले गेले.

काय आहे प्रकरण ?

शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होण्यापूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, कर्नाल जिल्ह्याचे उपविभागीय दंडाधिकारी आयुष सिन्हा पोलिस कर्मचाऱ्यांना सूचना देत आहेत की, ‘ कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही किमतीत मर्यादेच्या पुढे जाण्याची परवानगी देऊ नये, मग त्यांची डोकी फोडावी लागली तरी चालेल. जर मला तिथे एकही आंदोलक दिसला तर मला त्याचं डोकं फुटलेले पाहिजे आणि हात तुटलेले पाहिजे. गोष्ट खूप सोपी आहे. कोणीही असो, कुठलाही असो, कोणालाही तिथे पोहोचण्याची परवानगी नाही. आपल्याला कोणालाही ती सीमा पार करू द्यायची नाही ‘ आणि त्यानंतर शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला होता.

केंद्रातील भाजप सरकारने नवीन शेतकरी कायदे आणल्यापासूनच शेतकरी भाजप नेत्यांचा विरोध करत आहेत. या सोबतच ते भाजपच्या सभांचा देखील विरोध करत आहेत. आणि यामुळेच जेव्हा शनिवारी भाजप नेत्यांची बैठक होणार होती. त्यावेळी शेतकरी नेत्यांनी महामार्ग रोखला. आणि याबाबतच एसडीएमने शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. जेव्हा एसडीएमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यांनतर अधिकाऱ्याच्या त्या आदेशावर टीका झाली. या निषेधाचा परिणाम असा झाला की, सत्ताधारी भाजपच्या लोकांनीही अधिकाऱ्याच्या आदेशावर टीका करण्यास सुरुवात केली मात्र आता या निंदनीय कामासाठी एसडीएमलाच जबाबदार ठरवून सरकार एसडीएमला बळीचा बकरा करणार ? कि त्यांना आदेश देणाऱ्या सत्तेतल्या लोकांवर कारवाई करणार हे येत्या काळात पाहावे लागेल .


शेअर करा