मला न विचारता पाणीपुरी का आणली ? , पुण्यात नवरा बायको भिडले अन त्यानंतर ..

शेअर करा

नवरा आणि बायकोमध्ये किरकोळ कारणावरून वाद होणे ही नवी बाब नाही मात्र चक्क मला न विचारता पाणीपुरी का आणली ? म्हणून एका दाम्पत्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर रागाच्या भरात पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली .प्रतीक्षा सरवदे असं आत्महत्या केलेल्या महिलंच नाव आहे तर गहिनीनाथ सरवदे असं तिच्या पतीचे नाव असून त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे,

उपलब्ध माहितीनुसार, गहिनीनाथ सरवदे हा मुळचा सोलापूर येथील रहिवासी आहे. लग्न दोन वर्षांपूर्वी त्यांचं प्रतीक्ष यांच्यासोबत लग्न झालं. गहिनीनाथ हा उच्चशिक्षित तरुण आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे. पुण्यात गहिनीनाथ एका मोठ्या कंपनीत कार्यरत असून पुण्यात राहण्यासाठी आल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला होता. दोघेही आंबेगाव पठार परिसरात राहत होते. ऑफिसवरून घरी येत असताना गहिनीनाथ याने पाणीपुरी पार्सल आणली मात्र घरी पाणीपुरी आणल्यानंतर प्रतीक्षा आणि त्याच्यात पुन्हा वाद झाला. मला न विचारला पाणीपुरी का आणली असा जाब प्रतीक्षाने विचारला आणि प्रतीक्षाने पाणीपुरी खाण्यास नकार दिला.

रात्री झालेल्या भांडणानंतर दुसऱ्या दिवशी गहिनीनाथ याने देखील दुसऱ्या दिवशी ऑफिसला डबा नेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रतीक्षाला देखील त्याचा राग आला आणि तिने रागाच्या भरात घरात असलेले विषारी औषध प्राशन केलं. प्रतीक्षा घरात बेशुद्ध पडल्यानंतर तिला तातडीने शेजारच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केल मात्र उपचार सुरू असताना प्रतीक्षाचा मृत्यू झाला. आपल्या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या वडिलांनी गहिनीनाथ याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गहिनीनाथ याला अटक केली आहे.


शेअर करा