‘ झोली उठाके वगैरे कर्मदरीद्री विचार.. ‘ उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच मोदींवर थेट टीका

शेअर करा

मला कल्पना आहे बऱ्याच दिवसांनी आपल्याला वाव मिळाला आहे. आवाज आपला कुणी दाबू शकत नाही. आवाज दाबणारा जन्माला येऊ शकत नाही. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना दसरा आणि विजया दशमींच्या शुभेच्या देतो. मलाही बरं वाटलं. कारण मला बऱ्याच दिवसांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनी आणि मातांनो अशी हाक देता आली, या वाक्यांनी उद्धव ठाकरेंनी संबोधनाची सुरुवात केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

शिवसेनेला दिलेलं वचन पाळलं असतं तरी मी राजकारणाच्या बाजूला झालो असतो. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री देणारच हे वचन पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडत आहे. पाय रोवून मी उभा आहे. हे काही थोतांड नाही. मै तो फकीर हूँ. झोली उठाके वगैरे असे कर्मदरीद्री विचार आमचे नाहीत.

काही लोकांना अजूनही वाटतं की मी मुख्यमंत्री आहे. तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन पूर्णपणे पाळलं असतं तर मुख्यमंत्री राहिलेही असता. आज नाही तर उद्या तुम्हीसुद्धा मुख्यमंत्री झाले असता. मी मुख्यमंत्री हे पद जबाबदारीने स्वीकारलेलं आहे. ही जबाबदारी मोठ्या विचाराने घेतली आहे. त्यांनी वचन पाळलं असतं आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री केला असता तर मी राजकारणाच्या बाजूला झालो असतो. माझ्यावर एक जबाबदारी आहे. ती मी पार पाडणारच आहे.

ठाकरे कुटुंबीयांवर हल्ला करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना तिथल्या तिथं ठेचून काढू. माझा वाडा चिरेबंदी आहे. टकरा मारा, काही करा आम्ही संकट परतवून लावू. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही. कुणी अंगावर आलं तर सोडत नाही. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागं लपायचं, असं चालणार नाही.

जे लोक म्हणतात की मी पुन्हा येईन, ते कधी येतील मला माहित नाही. सत्तेऐवजी लोक महत्वाचे आहेत. माझे भाषण संपते कधी आणि यांना चिरकायला मिळते कधी याची वाट बघत आहेत. तुम्ही मुख्यमंत्री राहिला असता. विचार एक होते म्हणून भाजपशी युती केली होती. माझ्या जन्म पुन्हा महाराष्ट्रात झाला पाहिजे व मला मुख्यमंत्री असल्याचा भास होऊ नये. अहम पणा डोक्यात जाऊ देऊ नको.

राजनाथ सिंह कोण म्हणतात की तुम्ही कधी सावरकर आणि गांधीजींना भेटलात का? 1992-1993 येथे दंगल झाली तेव्हा येथे कोण होते. बाबरी मशिदीच्या वेळी सगळे गप्प होते, त्यांची छाती थरथरत होती, शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी स्वीकारली आणि अभिमानाने सांगितले आम्ही हिंदू आहोत. आज तोच शिवसैनिक तुमचे शब्द ऐकत नाही (पालखी घेऊन जात नाही) त्यामुळे भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला जातोय.

मला ठाण्याच्या शिवसैनिकांचा अभिमान आहे, नवरात्रीच्या वेळी येथे गरबा होतात, गरबाला परवानगी नव्हती, सर्व शिवसैनिकांनी रक्तदान केले, मला अभिमान आहे. महाराष्ट्राकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणं, की इथे काही घडले तर असे म्हटले जाते की लोकशाहीचा खून इथेच झाला. उत्तर प्रदेशात काय चालले आहे? 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, महाराष्ट्राच्या पोलिसांनी दहशतवाद्यांना ठार मारले. तुम्हाला काय वाटते तुम्ही त्यांना माफिया काय बोलवत आहात. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री प्रियंका, राहुल, छत्तीसगड, तिथ काय चालले होते ते थांबवले.

युवा शक्तीला कामाची गरज आहे, पण ते या नोकऱ्या कोठे आहेत, आम्ही महाराष्ट्रात रोजगार आणि रोजगाराच्या संधी देत ​​आहोत प्रत्येक प्रयत्न केला जात आहे इथे महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या भवन मराठी भाषा भवन बांधण्यासाठी लवकर काम करणे, धारावीतील लोकांचे पुनर्वसन करणे, परंतु आर्थिक केंद्र देखील उभारणे, मुंबईत आर्मी तुम्ही एक संग्रहालय बांधत आहात ज्यामध्ये लष्कर तुमचे रक्षण करत आहे, कोणत्या परिस्थितीत ते कोणत्या प्रकारच्या बॉम्बचा सामना करत आहेत, ते किती कर्तव्य बजावत आहेत, हे तुम्ही जाणवू शकता.

आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस असतो. शस्त्रपूजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पुजा केली. आपल्यावर फुलं उधळली. ही माझी खरे शस्त्र आहेत. हे आशीर्वाद घेत असताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवाह हाच मिळायला पाहिजे. आणि महाराष्ट्रात जन्म व्हायला पाहिजे. आणि मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये.

माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. कारण काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील. पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे.


शेअर करा