कर्जतमध्ये खळबळ..आई बाहेर जाताच त्याने दोरी काढली अन .

शेअर करा

नगर जिल्ह्यात कर्जत इथे एक खळबळजनक घटना उघडकीला आली असून दहावीच्या परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयाचा दहावीतील विद्यार्थी असलेला अथर्व महादेव हजारे ( वय सोळा ) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. शुक्रवारी हा प्रकार घडलेला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाला त्यावेळी त्याला 60 टक्के मार्क मिळाले होते. आपल्याला इतके कमी मार्क मिळाल्यामुळे तो नैराश्यात गेला आणि त्याने कर्जत शहरातील गदादेनगर येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अथर्व याची आई घराबाहेर गेलेली असताना त्याने हा प्रकार केला.

अथर्व हजारे याचे वडील प्राथमिक शिक्षक असून कर्जत तालुक्यात ते कार्यरत आहेत. घटना लक्षात आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर जामखेड तालुक्यातील देवदैठण या मूळगावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


शेअर करा