शेतातून अपहरण करून गाडीत कोंबून लॉजवर नेले अन त्यानंतर..

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात समोर आलेली असून जमालपूर शिवारातून एका महिलेला शेतातून पळून नेले आणि लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आलेले आहेत. आरोपींनी विवाहित महिलेला मारहाण देखील केलेली असून औसा पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकलेल्या असून तपासाला सुरुवात केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी ज्ञानेश्वर विष्णू सूर्यवंशी ( राहणार जमालपूर ) आणि एक अनोळखी कारचालक हे जमालपूर शिवारात आले आणि येथील एका महिलेला उचलून गाडीमध्ये बसवून तिला औसा येथील अक्षय लॉजवर आणण्यात आले . तिथे आल्यानंतर तिला मारहाण देखील करण्यात आली आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. आरोपींनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर लातूर शहरात आणून सोडले.

महिलेने त्यानंतर आपल्या कुटुंबाशी संपर्क साधून रात्री उशिरा औसा पोलीस ठाण्यात पोहोचली आणि त्यानंतर तिने आरोपींच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली . औसा येथील या लॉजवर याआधी देखील असे अनेक गैरप्रकार घडलेले असून अनेकदा नागरिकांनी निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.


शेअर करा