आत्ताची निवडणूक लोकांनीच हाती घेतलीय , भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की.. 

शेअर करा

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आलेली असून त्यांच्या या उमेदवारीवर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत . गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात अपेक्षित असा विकास झालेला नाही . निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे मतदार संघावर ही वेळ आल्याची टीका नागरिकांकडून सध्या केली जात आहे

महाविकास आघाडीकडून वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी बोलताना,’ सदाशिव लोखंडे हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत त्यामुळे ते माझ्यावर आरोप करत आहेत. तूप खरेदी प्रकरणाची चौकशी झालेली होती पण त्यात काही निष्पन्न झालेले नाही. मतदार संघातील तालुक्यांचा माझा पहिला प्रचार दौरा पूर्ण झालेला आहे. खासदार नसताना देखील मी जनतेसोबत संपर्क ठेवला. आत्ताची निवडणूक लोकांनीच हाती घेतलेली आहे . विकास कामे करताना कोणी ठेकेदारी केली आणि टक्केवारी घेतली हे सर्वांना ठाऊक आहे ,’असे म्हणत त्यांनी सदाशिव लोखंडे यांच्यावर निशाणा साधलेला आहे. 


शेअर करा