देशाला भारत सरकार हवे आहे मोदी सरकार नव्हे , जो देईल साथ त्याचा करू घात असा व्यक्ती..

शेअर करा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना आम्हाला मजबूत सरकार पाहिजे पण ते सर्वसमावेशक असावे . सर्वांना सोबत नेणारा कणखर नेता आम्हाला गरजेचा आहे. जो देईल साथ त्याचा करू घात असा व्यक्ती आणि पक्ष आम्हाला नको आहे , असे म्हटलेले आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘ आम्हाला भारत सरकार हवे आहे मोदी सरकार नको आहे. यंदाच्या निवडणुकीत लोकशाही विरोधात एकाधिकारशाही आणि हुकूमशाही यांची लढत जनतेसोबत आहे. बीआरएसचे जळगावचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत करत देशाला मोदी सरकार नको तर भारत सरकार हवे आहे असे म्हटलेले आहे .


शेअर करा