उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का ? तब्बल ‘ इतके ‘ आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत

शेअर करा

सात महिन्यानंतर होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये एका मोठ्या बंडाची तयारी होत आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार विद्यमान १२६ आमदार भाजपशी फारकत घेऊन दुसऱ्या पक्षात सामील होण्याच्या बेतात आहेत, असा गौप्यस्फोट योगी आदित्यनाथ सरकारच्या एका मंत्र्याने केला आहे. दैनिक लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे .

सरकारमध्ये मंत्री आणि आमदारांचे काहीही ऐकून घेतले जात नाही. तसेच त्यांना महत्त्वही दिले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणांवर नाराजी आहे.काही दिवसांपूर्वीच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामार्फत राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी अन्य सदस्यांसोबत योगी आदित्यनाथ सरकारच्या स्थितीचे आकलन केल्यानंतर दावा केला होता की, सर्व काही ठीक आहे. नेतृत्वात बदल होणार नाही. कारण आम्ही मंत्री आणि आमदारांशी चर्चा केलेली आहे.

जमिनीवर मात्र केंद्रीय नेतृत्वाकडून योगी आदित्यनाथ यांचे पंख कापण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदी शाह टीम योगी आदित्यनाथ यांच्यावर नाराज असून योगी आदित्यनाथ यांची कट्टर हिंदुत्वाची ओळख आहे . आदित्यनाथ यांना पदावरून दूर केले तर वोट बँक तुटण्याची भीती आणि ठेवावे तर भाजपचेच निम्म्याहून अधिक आमदार आदित्यनाथ यांच्यावर नाराज आहेत . भाजप आता ‘ धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय ‘ अशा भूमिकेत अडकली आहे . वेळ पडली तर आदित्यनाथ यांना दूर केल्यास ते नवीन पक्ष काढून भाजपलाच हादरा देऊ शकतात आणि पदावर ठेवावे तर केंद्रीय नेतृत्वालाच आव्हान भविष्यात उभे राहू शकते, यामुळे परिस्थिती अवघड होत चाललेली आहे .

भाजपचे आ. राकेश राठोड यांनी सरकारविरुद्ध याआधीच बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. त्यांचा आरोप आहे की, सरकारच्या लेखी आमदारांना महत्त्वच नाही. कोणी बोलले, तर कायद्याचा बडगा उगारून त्याची बोलती बंद केली जाते. त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन बघता ते भाजपविरुद्ध बंड करण्याच्या मन:स्थितीत असल्याचे संकेत मिळतात.फिरोजाबादचे आ. राम गोपाल लोधी यांच्यासह दुसरे आमदारही भाजपविरोधी भूमिका घेत निवडणुकीआधी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत दिसतात.भाजपच्या सर्व आमदारांवर बसपा आणि समाजवादी पार्टी लक्ष ठेवून आहे.


शेअर करा