लॉकडाऊनमध्ये जमलं आणि अनलॉक होताच बायको प्रियकरासोबत फरार : कुठे घडली घटना ?

शेअर करा

लॉकडाऊनमुळे विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्यांची चांगलीच गोची झाली होती आणि त्यांच्या ह्या कारनाम्यात लॉकडाऊनने अनेक अडचणी निर्माण केल्या होत्या. लॉकडाऊनमुळे आजवर झाकलेल्या अनेक आश्चर्यकारक घटना समोर आल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये जमलेली काही प्रकरणे अनलॉक झाल्यानंतर उघड झाली आहेत . अशाच एका प्रेमप्रकरणामध्ये सदर महिलेचे प्रेमप्रकरण हे लॉकडाऊनमध्ये सुरु झाले आणि लॉकडाऊन अनलॉक होताच बायको प्रियकरासोबत पळून गेली.

घडलेली घटना ही बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील बखरीच्या शकरपुरा येथील आहे. सदर महिलेचा पती हा गुजरातहून परतला होता मात्र आल्या आल्या त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते . एक वर्षांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते, त्यानंतर पती काही दिवसातच गुजरातला कामासाठी गेला, मात्र त्यावेळी त्याने पत्नीला तिच्या माहेरी ठेवले होते . माहेरी गेली असताना सदर पत्नीची तिच्या आधीच्या प्रियकरासोबत जवळीक वाढली. पुढे लॉकडाउननंतर पती घरी परतला मात्र त्याला क्वारंटाईन करण्यात आले. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर तिला घेण्यासाठी पती त्याच्या सासुरवाडीला आला, दरम्यान बायकोने प्रियकरासोबत पळून जाण्याचा कट रचलेला होता मात्र तरी देखील अगोदरच्या प्लॅनिंग प्रमाणे ती पतीसोबत बेगूसराय येथे आली.

बेगूसरायमध्ये आल्यानंतर ती पतीच्या घरी राहू लागली मात्र योग्य वेळ येताच ती घरातून पसार झाली. कामावरून घरी आल्यावर पतीच्या ही गोष्ट लक्षात आली. इकडे तिकडे शोध घेऊनही काहीच माहिती हाती लागेना म्हणून त्याने पोलिसात तक्रार नोंदवली आणि तपासाची चक्रे फिरू लागली.

पोलिसांच्या तपासाला यश आले आणि अखेर तिला व तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले, मात्र तिने पतीसोबत जाण्यास नकार दिला. तिची आता प्रियकरासोबतच राहण्याची इच्छा असून पती आता हे प्रकरण पंचायतीत मांडणार आहे. मात्र सरकारी नियमाप्रमाणे तिला पुन्हा पतीकडेच पाठवण्यात आले आहे .


शेअर करा