राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘ काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी निघालेल्या भाजपमध्येच 40% लोक काँग्रेसचे आहेत त्यामुळे काँग्रेसयुक्त भाजप झालेला आहे. लोकशाहीमध्ये सत्तारूढ पक्षांच्या बरोबरीने विरोधकांना देखील महत्त्व असते मात्र एकही विरोधक ठेवायचा नाही ही संस्कृती भाजपची संस्कृती लोकशाहीला घातक आहे ,’ अशी टीका केलेली आहे
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे स्नेहभोजनासाठी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासह इतर अनेक नेते थांबलेले होते त्यावेळी सुशील कुमार शिंदे , मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. ‘ मोहिते पाटील आमच्या सोबत पक्षात येत आहेत. आमच्या आमदारांची संख्या कमी असली तरी निकालानंतर संख्या वाढलेली आमच्या खासदारांची संख्या वाढलेली दिसेल ‘ असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले.