गौतम अडाणीकडून ईस्ट इंडिया कंपनीसारखी देशाची लूट सुरु पण..

शेअर करा

काँग्रेस पक्षाने काढलेल्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळालेला असून पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सध्या चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेस देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागात यात्रा काढण्याच्या विचारात असून पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी अरुणाचल प्रदेश ते गुजरात अशी यात्रा काढण्यात येईल असे सांगितलेले आहे.

काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात गौतम अडाणी यांच्यावर राहुल गांधी यांनी जोरदार निशाणा साधला त्यावेळी, ‘ गौतम अडाणी हे ईस्ट इंडिया कंपनीसारखे देशाला लुटत आहेत. आम्ही पंतप्रधानांना विचारले तुमचा अडाणीशी संबंध काय त्यानंतर मोदी सरकारने अडाणींना संरक्षण देणे सुरू केले. भाजप आणि आरएसएसचे लोक हे सत्तेसाठी हपापलेले आहेत. आमचे परराष्ट्रमंत्री म्हणतात की चीनची अर्थव्यवस्था आमच्यापेक्षा खूप मजबूत आहे म्हणून आम्ही त्यांच्याशी लढू शकत नाही हा कसला राष्ट्रवाद आहे ? ‘ असे देखील राहुल गांधी पुढे म्हणाले.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी बोलताना, ‘ भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. लोकशाही वाचवण्यासाठी लोकांना हुकूमशाहीविरुद्ध जोरदार लढा द्यावा लागणार आहे. सरकार जनतेसाठी काम करत नाही फक्त हुकूमशाही चालवत आहे. गरीब अनुसूचित जाती जमाती, महिलांशी संबंधित मुद्दे आम्हाला संसदेत मांडू दिले जात नाहीत, ‘ असे देखील ते म्हणाले .


शेअर करा