‘ मला पण लग्न करायचंय पण सध्या..’ , काय म्हणाली तेजश्री प्रधान

शेअर करा

होणार सुन मी या घरची ‘ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या चर्चेत असून या मालिकेमध्ये तिने साकारलेले जान्हवी नावाचे पात्र अद्यापही प्रेक्षकांच्या मनात आहे. तिचा सहकलाकार असलेला शशांक केतकर याच्यासोबत तिने लग्न देखील केले मात्र दुर्दैवाने त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही त्यानंतर शशांक याने दुसरीकडे लग्न केले तर तेजश्री अद्याप चांगल्या जोडीदाराच्या शोधात आहे.

तेजश्री हिने एका मुलाखतीमध्ये , ‘ आपल्याला पुन्हा लग्न करायचे आहे. आपला देखील सुखाचा संसार असावा असे आपल्याला वाटते असे म्हटलेले आहे. तेजश्री म्हणाली की , ‘ लग्नासाठी मला फार काही स्थळ येत नाहीत. मी स्पष्ट बोलते त्यामुळे एखाद्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा चढउतार येतात तेव्हा आपण कोलमडून जातो करिअर थांबवतो ब्रेक घेतो मात्र मी स्वतःला सांगितलं की नीट राहायचं असेल तर काम करणं गरजेचं आहे. काही लोकांचा समज आहे की मी करिअरकडे खूप लक्ष देते , ‘ असे मला बऱ्याच व्यक्तींकडून कळालेले आहे.

तेजश्री पुढे म्हणाली की , ‘ खरे तर मला माझे कुटुंब खूप आवडते मला देखील लग्न करायचे आहे. लग्न करायचे होते म्हणूनच मी 24 व्या वर्षी तो निर्णय देखील घेतला होता. योग्य स्थळ आणि जबाबदार मुलगा मिळाला की मी लग्न करण्याचा निर्णय घेईल. लग्न या शब्दाचा आदर करणारा जबाबदार शांत आणि माझी बडबड ऐकणारा मुलगा मला हवा आहे कारण मला बोलायला खूप आवडतं . मी पार्टी करणारी मुलगी नाही तर कुटुंबासोबत एकत्रित वेळ घालवायला मला आवडत ,’ असे देखील तिने म्हटलेले आहे .


शेअर करा