राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातील परिस्थिती बद्दल खडे बोल सुनावले आहेत . करोनाबळी स्पष्टपणे दर्शवले तरच संसर्गाचा पुढील धोका टाळता येईल. मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. संसर्गाचा दर अधिक असतो तेव्हा नमुने तपासणी पूर्वीपेक्षा किमान दोन पटीने वाढवणे आवश्यक असते. मुंबईत मात्र ते ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. १० हजार चाचण्यांची क्षमता असताना मुंबईत केवळ साडेतीन ते चार हजार चाचण्याच होत आहेत. करोना रुग्णांची आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही तर करोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव घालणं आवश्यक आहे, निसर्ग वादळातून मुंबई वाचली असली तरी करोनाच्या वादळाला सुद्धा तितक्याच गांभीर्यानं घ्यावं लागेल, असे देखील फडणवीस यांनी पुढे म्हटले आहेत .
आपल्या ट्विटर हॅण्डलवरून फडणवीस यांनी हे पत्र व्हायरल केले आहे, त्यात ते म्हणतात, ‘राज्यातील एकूण चाचण्यांमध्ये १ मे रोजी मुंबईतील प्रमाण ५६ टक्के होते. ३१ मे रोजी हेच प्रमाण २७ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. चाचण्यांची संख्या कमी झाली असताना करोनाबळींची संख्या मात्र झपाट्यानं वाढतेय. राज्यात २७ मे पर्यंत एका दिवसातील मृतांची सर्वाधिक संख्या १०५ होती. पुढच्या दोन दिवसांत ती ११६ वर पोहोचली आणि ३ जून रोजी १२२ मृत्यू होऊन नवा उच्चांक प्रस्थापित झाला.
सरकारी रेकॉर्डवर करोना बळींची संख्या दाखवली जात असली तरी अनेकांच्या मृत्यूपत्रातून ‘करोना’ किंवा ‘करोना संशयित’ हे शब्द वगळण्यात आले आहेत. मुंबईतील भांडुप आणि विलेपार्ले येथील मृतांचे दाखलेही फडणवीस यांनी दिले आहेत. मृत्यूचं कारण स्पष्ट नसलेल्या अशा लोकांच्या अंत्यसंस्काराला होणाऱ्या गर्दीमुळं संसर्ग पसरण्याचा धोका आहे,’ अशी देखील चिंता त्यांनी ह्या पत्रात व्यक्त केली आहे .
संबंधित बातम्या
लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रात चक्क राष्ट्रवादीच्या आमदाराचे सामूहिक नमाज : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=149
जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील ‘ ह्या ‘ मंत्र्याला कोरोनाची लागण ,मुंबईला हलवणार
https://nagarchaufer.com/?p=134
आरती कीजै नरेन्द्र ललाकी म्हणत नरेंद्र मोदींची आरती झाली लाँच…काय आहेत आरतीचे बोल ?
https://nagarchaufer.com/?p=103
महाविकास आघाडी सरकारकडून ‘या’ सहा गोष्टींवरील निर्बंध झाले शिथील : काय आहेत त्या गोष्टी ?
https://nagarchaufer.com/?p=339
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फेसबुकवर गंभीर चूक,महाराष्ट्र बचावची सगळी बनवाबनवी उघड : काय आहे प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=76
महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89
नमस्ते ट्रम्प साठी आले होते तेव्हा ‘ ते ‘ कानावर पडलं असावं : जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर हल्लाबोल
https://nagarchaufer.com/?p=302