‘ किसान एकता मोर्चा ‘चं फेसबुक पेज ‘ ब्लॉक ‘ म्हणाले की .. ?

शेअर करा

केंद्रातील मोदी सरकारनं घाईघाईत आणलेल्या कृषी कायद्यांचा शेतकरी संघटनांकडून विरोध सुरू आहे. या दरम्यान या आंदोलनाची माहिती सोशल मीडियाद्वारे पोहचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तयार करण्यात आलेलं एक फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज रविवारी अचानक ‘ब्लॉक’ करण्यात आलेलं दिसलं. यानंतर मात्र सरकार आणि फेसबुकवर चौफेर टीका सुरु झाल्यावर ऑनलाईन सेन्सॉरशीप सुरु असल्याचा मुद्दा देखील चर्चेत आला . त्यानंतर फेसबुकला सद्बुद्धी सुचली आणि तीन तासांनी ब्लॉक केलेलं पेज पुन्हा सुरू झालं.

रविवारी सायंकाळी अचानक फेसबुककडून ७ लाखांहून अधिक फॉलोअर्स असणारं ‘किसान एकता मोर्चा’चं पेज ब्लॉक करण्यात आलं. एका लाईव्ह व्हिडिओनंतर हे पेज ब्लॉक करण्यात आलं होतं. त्यामुळे ‘किसान एकता मोर्चा’च्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवरून कोणतीही माहिती शेअर करता येत नव्हती. शेतकरी संघटनांकडून पत्रकार परिषदेत माहिती दिल्यानंतर योगेंद्र यादव एक फेसबुक लाईव्ह करत असतानाच हे फेसबुक पेज बंद झालं होतं.

फेसबुक नियमांच्या उल्लंघनामुळे हे पेज ब्लॉक करण्यात आल्याचं फेसबुककडून सांगण्यात येत असल्याचं या फेसबुकच्या मॅनेजरनं म्हटले असले तरी अनकी दास प्रकरणानंतर सरकार आणि फेसबुक यांचे लागेबांधे लपून राहिलेले नाहीत. फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या व्हाट्सएप्पवर नुकतेच पेमेंट ऑप्शन देखील सुरु झाले तसेच काही महिन्यापूर्वीच फेसबुकमध्ये मुकेश अंबानी यांनी गुंतवणूक केलेली होती, त्यामुळे सोशल मीडियात देखील अंबानी सक्रिय झाले आहेत, अशा पार्श्वभूमीवर आगामी काळात सरकारला विरोध करणारी आणखी काही पेजेस देखील बंद होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही .

किसान एकता मोर्चा’चे पेज ब्लॉक करण्यात आल्यानंतर टीकेनंतर मात्र फेसबुकनं किसान एकता मोर्चाचं पेज पुर्ववत केलं. तसंच इन्स्टाग्रामवर नवीन कंटेन्ट अपलोड करण्यात आलेली बंदीदेखील हटवण्यात आली. गेल्या तीन आठवड्यांहून अधिक काळापासून शेतकरी सीमेवर ठाण मांडून बसलेत. सरकारशी झालेल्या सगळ्या चर्चा निष्फळ ठरल्यात. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी संघटना अडून बसल्यात. या संघटनांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या किमान हमीभावाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्यास नकार दर्शवलाय.


शेअर करा