सरकारी आकड्यापेक्षा तब्बल ‘ इतके ‘ पट आहे मृत्यूचा आकडा, पत्रकार अभिसार शर्मा यांचा दावा

शेअर करा

मोदी देश चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे आता स्पष्ट झाले असून अशाही परिस्थिती सेंट्रल विस्टा या पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे काम सुरु असल्याने सध्या देशातील नागरिकांना ऑक्सिजन आणि हॉस्पिटल गरजेचे की सेंट्रल विस्टाचे बांधकाम यांचा विचार करण्याची नागरिकांवर वेळ आली आहे. केंद्राच्या प्राथमिकता चुकीच्या असून देशात भयावह परिस्थिती आहे . पत्रकार अभिसार शर्मा यांच्या दाव्यानुसार सरकारी आकड्यांपेक्षा तब्बल १० पट म्हणजे रोज ३० ते ४० हजार रुग्ण दगावत असल्याचा त्यांनी दावा केला आहे . आपल्या एका युट्युब चॅनेलवर त्यांनी हा दावा आहे .

महाराष्ट्रात देखील येत असलेले आकडे आणि जमिनीवर असलेली परिस्थिती यात फरक दिसत असून साधारण प्रत्येक घरात कोणी ना कोणी तरी पॉझिटिव्ह येत आहे. स्मशानभूमीत येणाऱ्या गाड्या आणि त्यात येणारे मृतदेह यांची संख्या देखील सरकारी आकडे यांच्याशी मेळ खात नाही . यामुळे सरकारी पातळीवर आकडेवारी दडपण्यासाठी आणखी एक यंत्रणा काम करते आहे का ? हा देखील प्रश्न उभा राहिलेला आहे . घरटी रुग्ण असून देखील कोरोनाची सरकारी आकडेवारी मात्र त्या प्रमाणात दिसत नसल्याने महाराष्ट्रात देखील आकडेवारी संशयाच्या भोवऱ्यात आहे.

कोरोनाची परिस्थीती हाताळण्यात मोदी सरकारला सपशेल अपयश आले आहे, त्यांच्या अहंकारामुळे देशातील जनता होरपळून निघत आहे. सुप्रीम कोर्टाला यात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनीच टास्क फोर्स नेमला. पंतप्रधान मोदी कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांनी लसीकरणाचा सावळा गोंधळ करून ठेवला आहे. 130 कोटी जनतेसाठी सरकारने घरोघरी जाऊन मोफत लसीकरण करायला हवे होते पण त्यांनी ते केले नाही. भारतातील लोकसंख्या विचारात घेता 300 कोटी लसींची आवश्यकता आहे. ती लवकर पुर्ण होणे अवघड आहे. घाईगडबडीत मोदी सरकारने चीनशी काही गुप्त करार केला आहे की काय? अशी शंका उपस्थित होत असून अशा गुप्त करारातून चीनचा कचरा लस म्हणून भारतीय जनतेवर लादतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे. मोदी सरकारच्या कारभारामुळे लोक भयभीत होऊन जगत आहेत. लोकांची चिंता वाढली असून कोरोनामुळे देशभर चिता जळतानाची विदारक दृश्ये दिसत आहे, अशी टीकाही काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे .

जगात भारत ताठ मानेने उभा राहिला तो पंडित नेहरूंपासून काँग्रेसच्या सरकारांनी केलेल्या विकासकामामुळे. परंतु दुर्दैवाने मागील सात वर्षात देशाच्या लौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. कोरोनाच्या महामारीत तर मोदी सरकारने देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून त्यांनी जनतेला फक्त ‘चीनचा कचरा, चिंता व चिता’, हे तीन ‘चि’ दिले आहेत. काँग्रेस सरकारांनी हरितक्रांती, श्वेतक्रांती करून देशाला स्वयंपूर्ण बनवले. 2008 च्या जागतिक मंदीचे चटके जग सहन करत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि लोकांना याची झळ बसू दिली नाही. ज्यांनी अच्छे दिन, विश्वगुरु, महासत्ता बनविण्याचे स्वप्न दाखवले. त्यांनी अवघ्या सात वर्षात भूतान आणि रवांडा यासारख्या देशांसमोर मदतीसाठी हात पसरवण्याची वेळ आणली, असेही पटोले पुढे म्हणाले.


शेअर करा