एकदा ईडी घुसली आणि ‘ अर्धवटराव ‘ गप्प बसले

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु केल्यावर त्याच्यावर सगळीकडून उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.राज यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना ‘ शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण केलं. 1999 ला राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जातीवाद वाढला ‘ असा गंभीर केला होता त्यावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनीही राज यांच्यावर हल्ला चढवला असून मुंडे यांनी राज ठाकरेंना रामदास पाध्ये यांच्या अर्धवटरावांची उपमा देऊन टाकली आहे .

काय म्हणाले धनंजय मुंडे ?

पूर्वी रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले. शरद पवार जातीयवादी राजकारण करतात म्हणून सांगता. चार खासदार त्यांनी पाठवले. पवार साहेबांनी समतेचं राज्य उभं केलं. भुजबळसाहेबांना, अमोल मिटकरींना, मला, अशी किती नावं आहेत, त्यांना मोठी पदं दिली. तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे.

जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष बनला. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्रीही होईल पण असा होणार नाही. जयंत पाटील साहेबांचं स्वप्न आहे की राष्ट्रवादीचे 100 आमदार निवडून आणायचे. हे स्वप्न नक्की पूर्ण होणार, असा दावाही मुंडे यांनी परिवार संवाद यात्रेत केलाय. माणसं सत्तेत आली की कशी माजतात हे मागच्या पाच वर्षात आपण पाहिलं, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केलीय.


शेअर करा