गूढ उलगडलं..समनापुर इथे आढळून आला होता तरुणाचा मृतदेह 

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून समनापुर इथे घरातील महिलांकडे वाईट नजरेने पाहत असल्याच्या कारणावरून एका व्यक्तीचा चाकूने गळा कापून करण्यात आलेला आहे. 22 मार्च रोजी समनापुर परिसरात ही घटना घडलेली असून तीन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत ( वय 22 राहणार समनापुर ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून संगमनेर लोणी रस्त्यावर एका हॉटेलजवळ मोकळ्या मैदानात त्याचा मृतदेह आढळून आलेला होता.पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपासला सुरुवात केलेली होती. 

घटनास्थळावरती पोलिसांना दारूच्या बाटल्या , चप्पल , काडेपेटी आणि मोबाईल अशा वस्तू आढळून आल्या त्यानंतर खबऱ्यांच्या माध्यमातून तपास केला त्यावेळी तपासाचे धागेदोरे हे सागर रमेश मुळेकर ( वय 21 वर्ष ) , राजेश मनोज मकवाणी ( वय 19 वर्ष दोघेही राहणार समनापुर ) यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिलेली असून या गुन्ह्यांमध्ये आणखीन एक आरोपी किसान सावंत याचाही सहभाग असल्याचे आरोपींनी सांगितले. 

पोलिसांनी तपास केला त्यावेळी सागर मुळेकर याच्या घरातील महिलांकडे आरोपी अब्दुल सावंत हा पाहायचा म्हणून संतापात अब्दुल सावंत याचा प्लॅन करून खून करण्यात आल्याचे समोर आलेले आहे. 


शेअर करा