मी डॉक्टर आहे..खासदार सुजय विखे यांची खास शैलीत राज्य सरकारवर टीका: पहा काय म्हणाले ?

शेअर करा

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली व करोनाच्या जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या उपाययोजनांवर टीका केली, ‘राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. मात्र, दुर्दैवाने राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे येथे कोणाचा मंत्री कुठे फिरत आहे आणि काय निर्णय देतोय, हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती नसते “, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारला फटकारले.

माध्यमांशी बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले,” राज्य सरकारकडे सध्या पैसे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते रोज एक नवा नियम काढत आहेत. राज्याचे सचिव वेगळा नियम काढतात. मुख्यमंत्री वेगळा जीआर काढतात. महसूलमंत्री वेगळाच जीआर काढतात. तर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी एवढचं काय तर गावचे सरपंच सुद्धा वेगळाच नियम काढत आहेत. त्यामुळे राज्यात मंत्री लॉक झाले आणि जनता अनलॉक झाली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोण कुठे चालले, याचा कोणालाच काही पत्ता नाही”

केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर हे सदोष असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता, त्यावर देखील सुजय विखे यांनी आपले मत मांडताना, ” मी डॉक्टर आहे. मला तर व्हेंटिलेटरबाबत तसे काहीच वाटले नाही. व्हेंटिलेटर सदोष असल्याचे ते कोणत्या निकषावर बोलत आहेत? त्यांच्याकडे तसा काही अहवाल आहे का? उलट ग्रामीण भागामध्ये जेवढे व्हेंटिलेटर आहेत, ते केंद्र सरकारच्या निधीतील असून ते लावल्यामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी आमच्यापर्यंत आलेली नाही “

त्यांनी माध्यमांशी बोलताना इतर काही प्रश्न देखील उपस्थित केले, ते म्हणाले, ” करोनाच्या अनुषंगाने नगर जिल्ह्याचा विचार करता केंद्राच्या निधीतून ५० व्हेंटिलेटर मिळणार आहेत. याशिवाय केंद्र सरकारकडून करोनाच्या अनुषंगाने राज्यातील रुग्णालयांना वेगवेगळे मेडिकल इक्यूमेंट दिले जात आहेत. पीपीई कीट दिले जात आहेत, मास्क दिले जात आहेत. हॉस्पिटलसाठी इक्यूमेंट देणे हे सुद्धा खर्चिक काम आहे. त्यामुळे राज्य सरकारला थेट आर्थिक साह्य करण्याची गरज काय ?


शेअर करा