देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांची पोलखोल करताच भाजपचा थयथयाट सुरु, कोणी केले तब्बल आठ ट्विट्स ?

शेअर करा

काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाल्याने ,देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांची पूर्णपणे पोलखोल महाविकास आघाडीकडून करण्यात आली त्यामुळे भाजपचा थयथयाट सुरु झाला असून एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर देण्यास तीन जण कशाला ? अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे . ट्विटरवर आशिष शेलार यांनी एका पाठोपाठ आठ ट्विट केले असून त्यात महाविकास आघाडीवर टीका केली आहे. भाजपला पत्रकार परिषद चांगलीच झोंबलेली दिसत आहे
.
काय आहेत आशिष शेलार यांचे ट्विट्स

  • ” आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस असून नसल्यासारखे वाटले. बहुतेक पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांची सुचना तंतोतंत पाळली.पळकुटी भूमिका आज पण दिसली! काँग्रेस पळुन दाखवतेय… किमान बाकीच्यांनी रडून नको करून दाखवा “
  • “आघाडीची तीन माणसं” बोलली.. पण मुख्यमंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री कुठे आहेत? मुंबईचे पालकमंत्री कुठे आहेत? मदतीचे पँकेज कुठे आहे? निष्पाप माणसं मरत आहेत.. खाटा नाहीत, डाँक्टर नाहीत, रुग्णवाहिका नाहीत.. त्याचे काय ते सांगा.. सामान्य माणसाचे हालहाल करताय त्यावर बोला!
  • गेली 20 वर्षे सत्ता असणाऱ्या, सुमारे 33 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांना उपचार देत आहात..@advanilparab हा आभास नाही सत्य! आभासी रडू नका,या सत्यावर बोला! मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलंत?त्याचं उत्तर द्या! 6/8
  • महाराष्ट्र द्रोही तर तुम्ही आहात..तुमची निष्क्रियता महाराष्ट्राचे नुकसान करतेय..महाराष्ट्राला मागे घेऊन जातेय. तुमच्या निष्क्रियतेने गिप्ट सीटी महाराष्ट्राने गमावली..सांगली ऐवजी अफ्रिकेत ऊस पिकवणे हा महाराष्ट्र द्रोह नव्हे काय?आता उद्योग महाराष्ट्रात येऊ नयेच असे का वागताय? 5/8
  • तथाकथित अर्थतज्ज्ञ @Jayant_R_Patil हे पण आज विपर्यास करुन-करुन रडले…पण किती रडणार? खोटं किती बोलणार?अर्थतज्ज्ञ म्हणवता मग महाराष्ट्रात अर्थक्रांती घडंवा ना..कुणी रोखलंय तुम्हाला..उगाच पावटे खाल्या सारखे का वागताय?दुर्गंधी का सोडताय ?”त्यांना”जमत नसेल “तुम्ही” करुन दाखवा! 4/8
  • आघाडीची “तीन माणसं” बोलली कि रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. अधी विरोधी पक्षाच्या नावानं.. आता थाबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा! रडू नका!! 3/8
  • महाराष्ट्रात सर्व आलबेल असल्याचे,आभासी चित्र निर्माण करणाऱ्या आघाडीच्या”तीन माणसांच्या” दाव्यांचा पर्दाफाश पत्रकारांनी त्याच जागी केला. पत्रकरांच्या पहिल्या प्रश्नातच मुंबईतील अपयश उघडे झाले आणि “तीन माणसं” एकमेकाकडे बघत बसले! आभासी फुगा जागीच फोडणाऱ्या पत्रकारांचे आभार!! 2/8
  • विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले त्यावर ऐवढी का कळ पोटात गेली.एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला “आघाडीची तीन माणसं” धावली.घाबरताय कशाला?तुमचं अपयश,नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे तर भित्रे,रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा,रडून नको! 1/8

संबंधित बातम्या

” तेव्हा ” काळ्या चड्ड्या बनियन घालून आंदोलन केलं असत तर महाराष्ट्राने पाठ थोपटली असती : संजय राऊत
https://nagarchaufer.com/?p=59

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या हातात ‘ फडणवीस हटाव ‘ चा फलक ? : जाणून घ्या काय आहे वस्तुस्थिती
https://nagarchaufer.com/?p=62

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी घेतलाय योगी आदित्यनाथ यांचा चांगलाच समाचार : पहा काय म्हणाले ?
https://nagarchaufer.com/?p=154

लॉकडाऊनचे नियम फाट्यावर मारत भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार खेळले क्रिकेट : व्हिडीओ व्हायरल
https://nagarchaufer.com/?p=142

देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्राकडून २८ हजार कोटींच्या दाव्याची महाविकास आघाडीकडून पोलखोल : पॉईंट टू पॉईंट
https://nagarchaufer.com/?p=177

सुजय विखे यांच्या ‘ त्या ‘ वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण : पहा काय म्हणाले ?
https://nagarchaufer.com/?p=181


शेअर करा